Thursday, 5 November 2020

प्रति दिन अनन्त जीवन का अनुभव कैसे करें

 _*प्रति दिन अनन्त जीवन का अनुभव 👉कैसे करें*_


 _*यूहन्ना 17: 3 "और यह अनन्त जीवन है, कि वे तुम्हें एकमात्र सच्चे परमेश्वर, और यीशु मसीह, जिन्हें तुमने भेजा है, जान सकते हैं।"*_


_पूरी तरह से *समझने के लिए कि अनन्त जीवन क्या है, यह समझने में मददगार है कि यह क्या नहीं है।  अनन्त जीवन हमेशा के लिए जीता रहना नहीं है।  हर कोई हमेशा के लिए स्वर्ग या नरक में रहता है।  साथ ही, अनन्त जीवन स्वर्ग के आशीर्वाद में हमेशा के लिए जीवित नहीं है क्योंकि नरक में तड़पाया जा रहा है।* योहन्ना 3:36 और 5:24 दिखाते हैं कि *अनन्त जीवन विश्वासी का वर्तमान पायी स्तिथि है।*_

_*यहाँ, यीशु परमेश्वर को पिता और यीशु मसीह को जानने के रूप में अनन्त जीवन को परिभाषित करता है।*_


 _जैसा कि हमने पहले ही चर्चा की है, *शब्द "पता" केवल बौद्धिक ज्ञान के बजाय अंतरंगता की बात कर रहा है।*  इसलिए, *अनन्त जीवन परमेश्वर पिता और यीशु पुत्र के साथ एक अंतरंग, व्यक्तिगत संबंध है।*_


_यूहन्ना 3:16 के अनुसार, परमेश्वर के साथ *यह घनिष्ठता ही उद्धार है।  हमारे पापों की क्षमा उद्धार की बात नहीं है: पिता के साथ अंतरंगता है।  बेशक, यीशु हमारे पापों के लिए माफी खरीदने के लिए मर गए क्योंकि अक्षम्य पाप हमें परमेश्वर के साथ अंतरंगता से रोकते हैं।  पाप एक बाधा थी जो हमारे और परमेश्वर के बीच खड़ी थी।  इससे निपटा जाना था और यह था।  जो भी उद्धार को केवल अपने पापों की क्षमा के रूप में देखता है और वहीं रुक जाता है, वह अनन्त जीवन को समझ नहीं पाए हैं।*_


_उद्धार का उद्देश्य परमेश्वर के साथ सामंजस्य बिठाने का तरीका है।_


_इसके बजाय, यह अक्सर इस जीवन की समस्याओं और बाद में नरक के फैसले से बचने के तरीके के रूप में प्रस्तुत किया जाता है।_


_अधिकांश गैर-विश्वासियों को उनके "नर्क इस धरती" पर इतना कब्जा है कि वे वास्तव में अपने अनन्त भविष्य के बारे में सोचते या परवाह नहीं करते हैं।  वे धर्म से तंग आ चुके हैं और किसी ऐसी चीज की तलाश कर रहे हैं जो अंदर के खालीपन ओ भर दे।_


 _*हमारे पिता के साथ केवल अंतरंग संबंध (अनन्त जीवन) ही ऐसा कर सकते हैं।*_

Tuesday, 3 November 2020

प्रकाश आणि अंधार



            *✨प्रकाश आणि अंधार✨*


 *तुझ्या शरीराचा दिवा तुझा डोळा होय; तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते; सदोष असला तर तुझे शरीरही अंधकारमय असते..✍🏼*

                   *( लूक ११:३४ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


    या संपूर्ण परिच्छेदातून पौलाने आम्हाला आध्यात्मिक आंधळेपण आणि अंतःकरणाचे कठीणपण यांच्या संबंधात कडक इशारा दिला आहे. मनुष्याचा डोळा हे एक साधन आहे. डोळा हे शारीरिक व आध्यात्मिकदृष्ट्या प्रकाश आणि प्रतिमा आत येण्यासाठीचे शरीराचे प्रवेशद्वार आहे. डोळ्याद्वारे प्रकाश व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये पोहोचतो. निरोगी किंवा निर्दोष डोळा प्रकाश आत येऊ देतो, पण अधू किंवा सदोष डोळा त्या व्यक्तीला अंधारातच ठेवतो. जर डोळा निर्दोष असेल तर मनुष्य पूर्ण प्रकाश मिळवू शकतो आणि त्याद्वारे आत येणाऱ्या प्रतिमांना ओळखू शकतो परंतु डोळे अंध असतील तर तो अंधार त्याच्यासमोर असलेल्या गोष्टी बदलतो किंवा विकृत करून टाकतो. म्हणून पौल आम्हाला इशारा देत आहे, आपण प्रकाश म्हणून स्वीकारतो तो खरोखर प्रकाशच आहे, अंधार नाही याची खात्री आम्ही करून घेणे गरजेचे आहे. पौल म्हणतो, *म्हणून तुझ्यामधील प्रकाश अंधार तर नाही ना, हे पाहा. ( वचन ३५)*


     आम्ही आमच्या डोळ्यांद्वारे काय पाहायचे आणि आमच्या जीवनात त्यातील काय घ्यायचे ह्याची काळजी घ्यायची आहे. कारण आम्ही ज्या गोष्टी पाहातो त्याच गोष्टी आमचे शारीरिक आणि आध्यात्मिक डोळे पाहात असतात. जर आम्ही पाहात असलेल्या गोष्टी किंवा प्रतिमा अधार्मिक किंवा दुष्ट असतील तर आध्यात्मिक दृष्ट्या त्या आमची मने भ्रष्ट करतील त्यामुळे देवाचे भय व त्याच्या आमच्या जीवनाबाबतीत असलेल्या योजना पूर्ण करण्यापासून आम्हाला परावृत्त करतील. याउलट आमचे आध्यात्मिक डोळे म्हणजे आमचे दृष्टीकोन, हेतू आणि इच्छा या देवाकडे आणि त्याच्या योजनांकडे लावलेले असतील तर आमच्यामध्ये आशीर्वाद, चारित्र्यगुण, आध्यात्मिक तारणाचा बाह्य पुरावा आणि देवावरील निष्ठा उत्पन्न करण्यासाठी त्याच्या वचनांचा प्रकाश आमच्या हृदयात प्रवेश करतो. वचन सांगते, *"तुझे सर्व शरीर प्रकाशमय असेल आणि त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसेल, तर दिवा आपल्या उज्ज्वल ज्योतीने तुला प्रकाशमय करतो त्याप्रमाणे ते पूर्णपणे प्रकाशमय होईल." ( वचन ३६)* परंतु आमच्या इच्छा जर देवाच्या गोष्टींवर केंद्रित नसतील, तर देवाचे प्रकटीकरण व सत्य आमच्यापासून दूर राहील. आमचे जीवन अंधकारमय होईल. म्हणून आम्ही प्रकाश म्हटलेल्या ख्रिस्ताला आमच्या अंतःकरणात घेतले पाहिजे.


     प्रियांनो, आम्ही वारंवार ही खात्री करून घेतली पाहिजे की, आमचे आध्यात्मिक डोळे उघडे आहेत आणि ते पापांकडे लक्ष लावीत नाहीत तर देवाच्या पवित्र वचनांकडे लक्ष केंद्रित करीत आहेत. देवाचे वचन आमचे जीवन आतून बाहेरून शुद्ध व पवित्र करते, नवीन करते, आमचे जीवन बदलण्यास ते समर्थ आहे. आम्ही आत्मपरिक्षण करावे की, आम्ही देवाच्या वचनाला योग्य प्रतिसाद देतो का ? किंवा देवाच्या वचनातील संदेशांचा स्वीकार करूनही, आम्हाला पापाच्या दास्यात ठेवणारा आध्यात्मिक कोरडेपणा आणि मृतपणा अद्यापही आमच्या जीवनात आहे का ? असे असेल तर आम्ही आमचे अंतःकरण उघडावे. देवाच्या वचनाचा प्रकाश आणि त्याचे आमच्या जीवनात असलेले हेतू, योजना हे पूर्ण होऊ द्यावेत. आम्ही आमच्या स्वतःच्या मार्गाने न चालता प्रकाशाच्या म्हणजेच ख्रिस्ताच्या मार्गाने चालावे. आमचे आध्यात्मिक डोळे सदोदित उघडे ठेवावेत. आमची देवावर असलेली प्रीति, त्याच्या वचनाची भूक आणि त्याचे हेतू साध्य करण्याची इच्छा परावर्तित होऊ शकेल अशाप्रकारे आम्ही देवाच्या वचनाच्या शिक्षणाला प्रतिसाद दिला पाहिजे. कारण स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे, *"तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे." ( स्तोत्र ११९:१०५)*


         *!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*


     

ख्रिस्ताची वधू

 *इफिस ५:२५-२७*


          *ख्रिस्ताची वधू*


     *अशासाठी की, त्याने तिला वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ व पवित्र करावे*...

            *इफिस ५: २६*..


       वधू म्हटलं की विवाहसोहळा डोळ्यासमोर येतो . आणि विवाहसोहळा म्हटलं की वधूची तयारी आलीच. मग कोणताही देश असो की कोणताही काळ असो, वधूच्या तयार होण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगदी बायबलच्या काळापासून तर आताच्या आधुनिक काळातही वधूच तयार होण याला महत्त्व आहे. 

     जुन्या करारात एस्तेरच्या विवाहसंबंधाने वाचायला मिळते. सहा महिने गंधरसाचे तेल आणि सहा महिने सुगंधी द्रव्ये आणि इतर शुद्धतेच्या वस्तू तिला सुंदर दिसण्यासाठी आणि राजाच्या पसंतीस उतरावी म्हणून लावण्यात आल्या होत्या. राजाकडे जाण्यापूर्वी आणखी सौंदर्य प्रसाधने त्या मुली मागू शकत होत्या.. पण एस्तेरने काही मागितले नाही कारण ती जाणून होती की, *परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते*. *नीति ३१:३०*..

     नवीन करारात अशी एक वधू आपल्या भेटीला येते. तिलाही शुद्ध होण्याची, जलस्नानाची गरज होती  पसंतीस उतरण्यासाठी..  *ही वधू म्हणजे ख्रिस्ताची वधू म्हणजे मंडळी*.. जर आम्हाला ख्रिस्ताची वधू व्हायचे असेल तर वचनरुपी जलस्नानाने शुद्ध व्हायला पाहिजे.  *हेच नव्या जन्माचे स्नान आहे*. निकदेमाला त्या रात्री प्रभू हेच सांगत होता की, *आत्म्याने आणि पाण्याने जन्मल्या वाचून स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही*.. 

    ख्रिस्ताची वधू जर आम्हाला व्हायचे असेल तर, वचनरुपी जलस्नानाने आणि आत्म्याने शुद्ध व्हायला हवे. *त्यामुळे आमच्यातील द्वेषाच्या सुरकुत्या, लोभ,राग,कुरकुर,अहंकार ह्यांचे डाग नाहीसे होतात*.अशी पापविरहित वधू प्रभूला पसंत पडणारी आहे. 

  *विश्वास, प्रार्थना,सेवा, समर्पित जीवन ही परमेस्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची आभूषणे आहेत*.. कारण विश्वासाने दुसऱ्या मृत्यूचे भय उरत नाही. प्रार्थनेने आमची परिस्थिती बदलून जाते, पापी अवस्थेतुन पावित्र्याकडे वाटचाल सुरू होते. सेवेमुळे अनपेक्षित आशीर्वाद मिळतात .. आणि समर्पित जीवनामुळे देवाच्या योजना आमच्या जीवनात सिद्धीस जातात.. 

    *जर प्रभूची वधू व्हायचे तर आमच्या सौंदर्य प्रसाधनात १) प्रभूची प्रीति, २) देवाच्या वचनाची ओढ, ३) ख्रिस्ताच्या आज्ञापालनाचे सौंदर्य,४) ख्रिस्तावरील विश्वासाचे सामर्थ्य, ५) पश्चाताप,  ही सुगंधी द्रव्ये हवीत*

    *प्रार्थना करू आपण की प्रभू ख्रिस्ता आम्हाला तुझी मंडळी या नात्याने तुझी  वधू व्हायचे आहे म्हणून आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर*..

       *आमेन*..


    

देव पक्षपाती नाही



          *✨देव पक्षपाती नाही✨*


 *जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करावयास मुखत्यार नाही काय ? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत सलते काय ?..✍*

                 *( मत्तय २०:१५ )*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


      देवाच्या राज्याचा भाग असणे आणि त्याच्या हेतूंमध्ये सहभागी होणे ही आपण स्वकष्टाने मिळवू शकतो अशी गोष्ट नाही, तर तो विशेष अधिकार आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला आहे. आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे परमेश्वराकडूनच आम्हाला प्रतिफळ मिळते. देव प्रतिफळ देणार आहे. परंतु कोणाला किती द्यायचे हे देव स्वतः ठरविणार आहे. आणि तो कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. ह्या अध्यायामध्ये या दृष्टांतामधून आपणांस पाहावयास मिळते की जेथे आजच्यासारखी सामाजिक कल्याणाची किंवा कामगार संघटनांची तरतूद नव्हती तर तेथे बेकारी, उपासमारीची परिस्थिती होती अशा त्या ठिकाणी या जमीनदाराचे हे कृत्य मोठ्या उदारपणाचे आहे. त्याने अगदी अखेरच्या तासापर्यंत, संध्याकाळ होत आली असतानाही आणि काहीही आवश्यकता नसतानाही, जे बेकार होते, दिवसभर ज्यांना काहीही काम मिळाले नव्हते अशा लोकांना काम देऊन, जास्तीचे कामकरी त्याच्या मळ्यामध्ये कामासाठी नेमले. परंतु त्याने त्यांना मजूरी देताना मात्र सकाळपासून जे काम करत होते त्यांच्याइतकीच मजूरी दिली. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला असे जे सकाळपासून काम करत होते त्यांना वाटले आणि ते कुरकुर करू लागले. खरे पाहिले असता त्यांचे जरी योग्य होते तरीही त्यात पक्षपातीपणा बिलकूल नव्हता. कारण त्याने ठरविलेली मजूरी त्यांना दिली होती. कोणा एकालाही कमी मजूरी दिली नाही. उदारपणे सर्वांना समान दिले, पक्षपात केला नाही. *ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील. ( वचन १६)*


     आमचा प्रभू न्यायी न्यायाधीश आहे. तो कोणावरही अन्याय होऊ देत नाही. तो ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देतो. देव पक्षपाती नाही. स्वर्गाचे राज्य देखील असेच आहे. देवाची कृपा मिळण्यासाठी आमच्या ठायी असलेल्या योग्यायोग्यतेच्या कल्पनांच्या कुठल्याही मर्यादा नाहीत. कारण देव आम्हाला देतो त्या गोष्टी आमच्या पात्रतेपलीकडच्या असतात. परंतु आम्ही त्यामध्ये समाधान न मानता, स्वतःची तुलना दूसऱ्यांबरोबर करतो. उधळ्या पुत्राच्या दाखल्यातील वडील भावाप्रमाणे आम्ही वागतो. आमच्या दृष्टीने जे अपात्र आहेत त्यांच्या बाबतीत देवाची उदार दृष्टी मान्य करणे आम्हाला खूप कठीण वाटते. स्वतःची तुलना इतरांबरोबर करणे हे धोक्याचे असल्याचा इशारा वचनाद्वारे आम्हाला मिळतो. कारण असे वागल्याने आम्ही अहंकारी, गर्विष्ठ होऊन इतरांना तुच्छ समजू लागतो. असे लिहिले आहे की, *आपण नीतिमान आहोत असा कित्येक स्वतःविषयी भरंवसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते. ( लूक १८:९)* किंवा मग आम्ही मत्सर करू लागतो आणि त्यांच्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करू लागतो आणि त्यांच्या गोष्टींचा लोभ धरू लागतो. याकोब म्हणतो, *तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात ? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करतात त्यांतून की नाही ? ( याकोब ४:१)* होय प्रियांनो, आमच्या ठायी असलेल्या द्वेष, मत्सर, ईर्षा ह्या गोष्टींमुळेच भांडणे, कलह होतो. 


     ह्या दाखल्याद्वारे प्रभू आम्हाला तीन चुकीच्या गोष्टींविरूद्ध इशारा देत आहे - १) उच्च पद, दर्जा मिळाल्यामुळे स्वतःला श्रेष्ठ समजू नये. २) देवाची आम्हांवरील कृपा, जिला आपण पूर्णपणे अपात्र आहोत ती सर्वांना सांगितली पाहिजे. ३) इतरांना मिळणारे आध्यात्मिक आशीर्वाद पाहून त्यांचा द्वेष, मत्सर करू नये. देवाने आम्हाला खूप आशीर्वादित असे जीवन दिलेले आहे. आम्ही जर इतरांबरोबर आमची तुलना न करता आमच्या आशीर्वादांवरच लक्ष केंद्रित केले तर परमेश्वराच्या कृपेने तुलना करीत बसण्याच्या आमच्यातील ह्या वाईट वृत्तीवर निश्चितच मात करता येईल. देवापासून रोज आणि रोज मिळणाऱ्या आशीर्वादांबद्दल आम्ही रोज आणि रोज त्याचे आभार मानले पाहिजेत, त्याला धन्यवाद दिले पाहिजेत. देव प्रत्येकाला आशीर्वादित करीलच करील. आम्ही इतरांना तुच्छ न लेखता, इतरांशी तुलना न करता देवाने दिलेल्या कृपेबद्दल, आशीर्वादांबद्दल देवाचे आभार मानले पाहिजेत. आणि देव पक्षपाती नाही हे ओळखून घेऊन देवाच्या ठायी असलेला चांगुलपणा ओळखला पाहिजे.


      *!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!


                            

देवाशिवाय सर्व निरर्थक

 *निर्गम १४:१०-१४*

    

    *देवाशिवाय सर्व निरर्थक*


   *परमेश्वर तुम्हासाठी लढेल; तुम्ही शांत रहा*.  

            *निर्गम १४:१४*


    फारो जेव्हा इस्राएल लोकांच्या मागे सैन्य घेऊन आला तेव्हा ते सर्व घाबरून गेले आणि कुरकुर करीत मोशेला दोष देत म्हणाले, "मिसरात काय कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला येथे मरायला आणले? पण फक्त मोशे म्हणतो, परमेश्वर तुम्हासाठी लढेल. केवढा विश्वास मोशेचा!!! त्याने आपले सर्व लक्ष देवाच्या सामर्थ्यावर केंद्रित केले, आणि तो स्वतः पुर्णपणे देवावर अवलंबून राहिला, आणि लोकांनाही तसे करायला लावले.. मोशेचा स्वतःवर नाही तर देवावर ठाम विश्वास होता. लोकांच्या दैहिक गरजासाठी सुध्दा मोशे देवावरच विसंबून होता. पुष्कळदा असे वाटते की मोशेला विश्वास न ठेवायला काय झाले, ठेवणारच तो कारण मिसरात देवाने जे चमत्कार केले इस्राएलच्या सुटकेसाठी ये सर्व मोशेने पाहिले होते आणि अनुभवले होतेच!!पण  *एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे चमत्कार फक्त मोशेने नाही तर सर्व इस्राएल लोकांनी पाहिले व अनुभवले होते*. पण त्यांनी विश्वास न ठेवता कुरकुर केली. 

      आमच्या वैयक्तिक जीवनात अनेक चमत्कार देवाने केलेले असतात, त्या क्षणापूरते आम्ही भारावून जातो पण परीक्षा प्रसंग आले की आमची कुरकुर चालू होते देवाविरुद्ध. *आमच्या पुढे निवड करण्याची ती वेळ असते, देवावर पूर्ण विश्वास टाकून शांत रहायचे की कुरकुर करायची* मोशेने देवावर का विश्वास ठेवला तर त्याला माहिती होते की, *विजय मिळवून देण्याची क्षमता फक्त परमेश्वरातच आहे*... देवाशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. 

      देवाचे सुप्रसिद्ध सेवक स्टॅनले

यांनी त्यांचा अनुभव सांगितला की, एक चर्चच्या सेशन कमिटीने सर्व कारभार स्वतः करायचा ठरवला, स्टॅनले यांना सांगितले की, तुमची आणि तुमच्या प्रार्थनेची गरज नाही,आम्ही सर्व कारभार उत्तम चालवू. कारण त्यांना विश्वास होता की कॉर्पोरेट वर्ल्ड त्यांच्या पाठीशी आहे, हाती पैसा आहे, ज्ञान आहे, उच्च शिक्षित आहोत तर आमचे चर्च उत्तम चालणारच हा ठाम विश्वास त्यांना होता. पण देवाला आणि त्याच्यावरील विश्वासालाच त्यांनी फाटा दिला. आणि काय झाले माहिती आहे? अवघ्या सहा महिन्यांत मंडळीत फूट पडली. आणि वाताहत झाली. *कोणत्याही क्षणी देव ह्या गोष्टी काढून घेऊ शकतो*. 

   देवाशिवाय सर्व निरर्थक आहे. *कारण देवशिवाय एकाही व्यक्तीला आपण देवाकडे आणू शकत नाही*कोणत्याही कामात यश मिळवू शकत नाही*... 

    पैसा, पद, प्रतिष्ठा, आमचे मोठया लोकांशी संबंध ह्या सर्व गोष्टी देवाशिवाय निरर्थक आहेत.. मंदिराची सेवा असो, ऑफिसमधील काम असो, समाजसेवा असो किंवा घरच्या बाबतीतील प्रश्न असोत , प्रत्येक वेळी फक्त देवावरच अवलंबून राहत त्याच्यावर पूर्ण विश्वासून चालले पाहिजे.  *कारण परमेश्वरा शिवाय सर्व निरर्थक आहे, तो आमच्यासाठी  लढणारा आहे*...

       *दयाघना माझ्या जीवनात फक्त तुलाच प्रथम स्थान असू दे आणि तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक आहे याची जाणीव सतत असुदे* *आमेन*...

    

 

रक्ताद्वारे नीतिमत्व

                 *✨रक्ताद्वारे नीतिमत्व✨*


*त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पूढे ठेवले, ह्यासाठी की, पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे..✍*

                       *( रोम ३:२५)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     नियमशास्राच्या पालनावाचून, देव न्यायीपणाने मनुष्याला निर्दोष ठरवू शकतो किंवा दूसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे देव पाप्यांचे तारण करतो. परंतु कसे ? तर *प्रभू येशू ख्रिस्ताने खंडणी भरून आणि आपल्या पवित्र रक्ताने प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे.* देवाने पापी मनुष्याला निर्दोष ठरविण्यासाठी एक योजना आखली आणि त्या योजनेनुसार देवाने आपला एकूलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या भूतलावर पाठवले. *शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकूलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता. ( योहान १:१४)* सर्व मनुष्यांनी पाप केल्यामुळे ते निर्दोष किंवा निष्पाप ठरू शकत नाहीत.  ह्यासाठी ख्रिस्त येशूने मनुष्याला पापाच्या दोषापासून मुक्त करण्यासाठी स्वतःचे मौल्यवान रक्त सांडून, खंडणी म्हणून स्वतःचे प्राण अर्पण केले. *त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. ( इफिस १:७)* 


      येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारेच केवळ नीतिमान ठरता येते. ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे देवाकडून विनामुल्य निर्दोष ठरविले जातात. ख्रिस्ताचे नीतिमत्व आमच्याकडे मोजण्यात येते, यालाच नीतिमान ठरवले जाणे असे म्हणतात. मनुष्य केवळ सत्कर्मे केल्यामुळे न्यायी ठरत नाही तर ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने न्यायी ठरतो. देवाने मनुष्याला पाप घडताच शिक्षा दिली नाही तर त्याने पश्चाताप करावा ह्याची सहनशीलतेने वाट पाहिली. आता, पापी मनुष्य नीतिमान ठरू शकतो, जेव्हा तो ख्रिस्ताचा आपला मुक्तीदाता म्हणून स्वीकार करतो. ह्यालाच विश्वासाने नीतिमान ठरवले जाणे म्हटले आहे. देव आमच्याकडे पाहातो तेव्हा त्याला आमच्यामध्ये किंचितही नीतिमत्व दिसत नाही. परंतु आम्ही *"ख्रिस्तामध्ये असलेले"* असे देवाच्या नजरेस पडतो, तेव्हा देवाच्या दृष्टीने आमच्यामध्ये असलेल्या विश्वासाद्वारे आम्ही नीतिमान ठरवले जातो.


    जून्या कराराच्या काळात वर्षातून एकदा प्रमुख याजक लोकांचे पाप कबूल करून पापासाठी वधलेल्या बकऱ्याचे रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जात असे व तेथे असलेल्या दयासनावर ते शिंपडत असे. आणि देव इस्राएल लोकांच्या पापांची क्षमा करी. *इस्राएल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापांबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित्त करण्यात यावे म्हणून हा तुम्हाला निरंतरचा विधी होय. ( लेवीय १६:३४)* परंतु आता येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे त्याचे मौल्यवान रक्त सांडल्यामुळे आता दूसऱ्या बलीची गरज उरली नाही. तो एकदाच सर्वांच्या पापांसाठी मेला आणि सर्वांना पापदोषापासून तोच मुक्त करू शकतो. *ख्रिस्तावरील विश्वासाने पापी मनुष्य नीतिमान ठरतो.*


  *देव "विश्वासाच्या द्वारे", "कृपेने", व "ख्रिस्ताच्या रक्ताने"  पापी मनुष्याला नीतिमान ठरवितो.*


      

Sunday, 1 November 2020

ख्रिस्तच पुनरुत्थान व जीवन



        *✨ख्रिस्तच पुनरुत्थान व जीवन✨*


*हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही, आणि तू पेरतोस ते पूढे आकारीत होणारे अंग पेरीत नाहीस, तर नुसता दाणा, तो गव्हाचा किंवा दूसऱ्या कशाचा असेल..✍*

    *(१ करिंथ १५:३६,३७ )*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     प्रेषित पौल करिंथ येथील लोकांस पुनरुत्थानाविषयी सांगत आहे. तो म्हणत आहे की, ख्रिस्ताद्वारेच केवळ पुनरुत्थान आहे. कारण मेलेल्यांतून उठविला गेलेला असा केवळ तोच एकच एक आहे. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त देखील म्हणत आहे की, *पुनरुत्थान व जीवन मीच आहे.* पौल येशूबद्दल सांगत आहे की, *कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांस सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे की, शास्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पूरला गेला, शास्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यांत आले. ( १ करिंथ १५:३,४)* आणखी पौल त्यांना हे सांगत आहे की, ते जे पेरतील, ते आधी मेले पाहिजे, तरच ते जिवंत केले जाईल किंवा उगवेल. जसे की आपण पाहातो, गव्हाचा किंवा इतर कुठलाही दाणा, जेव्हा मातीत पूरला जाईल, म्हणजेच तो मरण पावला जाईल, तेव्हाच तो अंकूरतो, उगवतो. आणि विपूल असे फळ देतो. आणि परमेश्वर त्याला आकार किंवा त्याचे अंग देतो. असे लिहिले आहे, *देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. तो बीजांतल्या प्रत्येकाला त्याचे अंग देतो. ( १ ले करिंथ १५:३८)*


    ख्रिस्तानेही शिष्यांना हेच सांगितले होते. जेव्हा त्याचे गौरव होण्याची वेळ जवळ आली होती तेव्हा त्याने शिष्यांना म्हटले होते की, *मी तुम्हाला खचित खचित सांगतो की, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहातो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. ( योहान १२:२४)* त्यामुळे त्याचे मरणे अगत्याचे होते कारण तो मेला आणि पुन्हा उठला, आणि स्वर्गात वर घेतला गेला. जर तो मेला नसता तर मेलेल्यांतून उठविला गेला नसता. आणि त्याचे गौरव झाले नसते. म्हणूनच त्याचे मरणे हे गरजेचे होते. परंतु आमचा प्रभू आमची खूप काळजी घेतो म्हणून त्याने तो जरी ह्या जगातून गेला तरी कैवारी म्हणून पवित्र आत्म्याला त्याने तुमच्या आमच्यासाठी पाठविले. आणि आज पवित्र आत्माच, ख्रिस्ताद्वारे आपल्याला चालवीत आहे, मार्गदर्शन करीत आहे. 


       *पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला. शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते. ( १ करिंथ १५: ४५,४६)* आणि पहिला मनुष्य म्हणजेच आदाम जसा परमेश्वराने मातीतून निर्माण केला. तसाच शेवटला आदाम  म्हणजेच येशू ख्रिस्त स्वर्गातून आहे. आणि पहिला मनुष्य हा प्राणमय होता. जगिक गोष्टींच्या मोहात पडून त्याच्याद्वारे मरण ह्या जगात आले. परंतु दूसरा मनुष्य प्रभू येशू ख्रिस्त हा आध्यात्मिक आहे. त्याच्याद्वारे मनुष्याला सार्वकालिक जीवन ही आशा प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे त्याच्याद्वारे आपल्याला पुनरुत्थानाची संधी किंवा आशा आहे, कारण मरणाची नांगी त्याने त्या वधस्तंभावर मोडली आहे, मरणावर विजय मिळवून तो जिवंत केला गेला आहे. आणि आजही तो जिवंत आहे. म्हणून प्रियांनो, ख्रिस्ताद्वारेच पुनरुत्थान आहे हे ओळखून आपण त्याच्यावर विश्वास ठेवू या, आणि त्याच्यावर विश्वास ठेवून, त्याच्या मार्गाने चालून, जसे तो मरणातून परत उठला तसेच आपणही पुनरूत्थानाद्वारे पुन्हा त्याच्याबरोबर जिवंत केले जाऊ, ही सार्वकालिक जीवनाची खात्री प्राप्त करून घेऊ या.


    *जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुती असो.*